जिंकले…. हुर्रे…. २०२३ मधील फायनल मॅच अजून आठवते.. त्या दिवशी पासून मी क्रिकेट मॅच पहायचं सोडलं होतं.. समजा आज मॅच आहे हे माहीत झालं की मी थेट कोण जिंकले एवढेच पहायचो.. २०२३ वर्ल्ड कप मध्ये एकही मॅच न हरलेली टीम थेट फायनल हरल्यामुळे लय हिरमोड झाला होता..

कित्येकदा क्रिकेट म्हटलं की ती मॅच आठवायची.. त्यानंतर जरी ट्वेंटी ट्वेंटी फायनल भारत जिंकला मात्र ती सल कायमच राहिली.. आजचा मॅच पहायची नव्हती मात्र विश्वास होता की हा संघ आपल्या मागच्या पराभवाचा वचपा काढेल..

अन् आज झालेही तसेच हार्दिक पांड्या नावडता खेळाडू मात्र त्याचे सलग २ उत्तुंग षटकार जीवात जीव आणणारे होते.. त्यानंतर शेट्टींच्या जावयाने भरकाऊन दिलेला विजयी षटकार हा खरा बदला ठरला..तसा मी जास्त क्रिकेट नादिक नाही मात्र थोड थोड पाहत असतो..

पहिलं सचिन आऊट झाला की मॅच बघू वाटतं नसायची तसं आता रोहित आऊट झाला की बघू वाटतं नाही मात्र यातही विराट कोहली असेपर्यंत बघायला हरकत नाही अस मनालाच सांगून स्वतःला सावरायचं.. श्रेयस अय्यर, गील सारखे खेळाडू ही टीम एकादोघावर नव्हे तर अख्ख्या संघावर अवलंबून असल्याचे दाखवतात…

फायनल काहीही होवो मात्र ऑस्ट्रेलिया संघाची मक्तेदारी अन् पराभवाचा वचपा काढणे आवश्यक आहे.. आपल्याकडच्या घराणेशाहीत जसे नेत्याचा मुलगा मतदारसंघ आपल्या घरचाच आहे असं वागतो तसं ऑस्ट्रेलिया संघाचे आहे..

मात्र त्यातही ते कर्मठ अन् चिवट आहेत..त्यांच्या कष्टाला कमी आखता येणारं नाही.. सगळ्या खेळांचे या आपल्या देशात क्रिकेटने वाटोळे केले असताना किमान क्रिकेट मध्ये तरी आपण टॉप असावं अशी देशवासीयांना माफक अपेक्षा आहे…
Wel Done ‘टीम इंडिया’
रोहित शर्माच्या ‘टीम इंडिया’ ने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला सपशेल नमवले. कोहलीची ‘विराट’ खेळी आणि इतर बॅटर्स ची खंबीर साथ यामुळे हे सहज शक्य झाले.भारताचा चार गडी राखून विजय झाला!
मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्तीसह सर्व गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. सर्वांच्या जिद्दीचा आणि सरावाचा तसेच टिच्चून खेळण्याचा हा विजय आहे. हार्दिक पांड्याच्या उत्तुंग षटकारांनी मजा आणली.झकास !
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि फायनलसाठी भरभरून शुभेच्छा.. यशस्वी भव : II
धनंजय गुंदेकर, बीड 096890 43949
